आ.बाळासाहेब थोरात यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून बर्डे कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

0

संगमनेर : गत पंधरा दिवसांपूर्वी तालुक्यातील पठार भागातील खंदळमाळवाडी नजीक असणाऱ्या वांदरकडा येथील बर्डे कुटुंबातील दोन भावांच्या चार चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या मुलांच्या कुटुंबीयांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी आमदार बाळासाहेब थोरात यांच्याकडून पाठपुरावा सुरू आहे. दरम्यान मृत मुलांच्या कुटुंबीयांना माजी मंत्री आमदार थोरात यांच्या यशोधन या जनसंपर्क कार्यालयामार्फत नुकतेच जीवनावश्यक वस्तूंचेेे वाटप करण्यात आले.
          वांदरकडा येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक इंग्रजीत थोरात यांनी नुकतीच बर्डे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करत त्यांना जीवनावश्यक वस्तू सुपूर्त केल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अजय फटांगरे, सरपंच शिवाजी फणसे, सुधीर शेळके, जयराम ढेरंगे, अरुण वाघ, दत्तात्रय आभाळे, आदिवासी सेवक प्रा.बाबा खरात, विक्रम कजबे, बाळासाहेब कुराडे, रमेश गपले, अक्षय ढोकरे, अविनाश आव्हाड, आदींसह यशोधन कार्यालयाचे जनसेवक व ग्रांमस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.वांदरकडा येथील बर्डे कुटुंबातील चार मुलांचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण पठार भागासह संगमनेर तालुक्यातून  हळहळ व्यक्त करण्यात येत होती. या घटनेनंतर काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी तातडीने प्रशासनाला मदतीच्या सूचना दिल्या. याचबरोबर दोन किलोमीटर पायी चालत जाऊन या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच शासनस्तरावर जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे यांनीही भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. यानंतर यशोधन कार्यालयाच्या वतीने जीवनावश्यक वस्तू बर्डे कुटुंबियांना देण्यात आल्या.यावेळी बोलताना इंद्रजीत थोरात म्हणाले की, संगमनेर तालुका हा एक परिवार आहे. बर्डे कुटुंबात घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे.पावसाळ्यामध्ये अशा घटना घडत असतात. त्यासाठी अशी दुर्दैवी घटना होऊ नये म्हणून वीज वितरण कंपनीने पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यात अत्यंत काळजी घेतली पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here