जावली तालुक्यातील सायगावातही खवय्यांसाठी मेजवानी सुरु.

0

सातारा/अनिल वीर : गावकरी हॉटेलनंतर गारवा बिर्याणीने धुमाकाळ साताऱ्यात घातला होता.तद्नंतर कराड व आता हॉटेल मातोश्री सायगाव, ता. जावली येथे माजी मंत्री तथा राष्ट्रवादीची तोफ शशिकांत शिंदे यांच्या हस्ते फित कापून औपचारीक शुभारंभ करण्यात आला.

         पाटणची १०० टक्के चविष्ट गॅरंटी देणारी बिर्याणी दाखल झाली आहे.अशी माहिती बंधुत्व पाटणरत्न नितीन पिसाळ यांनी दिली. सी गोल्ड रेस्टॉरंट हे पिसाळ यांनी पाटणमध्ये सुरू करून बिर्याणीची चव खवय्यांना  दिलेली आहेच.शिवाय,जत्रा थाळीनेही भुरळ घातलेली आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देऊन समाधान व्यक्त केलेले आहे. नव्या खाद्य संस्कृती पर्वाची मेजवाणी सायगावातही मिळणार आहे.

    यावेळी आ.शिंदेसह,दीपक पवार, अमित कदम,श्री. व सौ.गिरी आदी मान्यवर,कार्यकर्ते, नागरिक व ग्राहक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.बिर्याणीसह अन्य खाद्य पदार्थांची मांदियाळी आहे.फक्त रु.९९/- मध्ये बिर्याणी मिळणार आहे. सदरच्या बिर्याणीचा आस्वाद बंधुत्व पाटणभूषण नितीन पिसाळ यांचे मित्र बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांनी संपूर्ण परिवारासह सायगावात भेट देऊन घेतला. नितीन पिसाळ यांनी स्वागत केले.प्रो.प्रा.सचिन कदम – पाटील यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले. याकामी, सौ.मनीषा सचिन कदम-पाटील, भानुदास कदम – पाटील, संदीप कदम – पाटील, समीर सय्यद, अनिल बोधे आदींनी अथक असे परिश्रम घेतले.परिसरातील खवय्यांची रेलचेल आहे.

फोटो : आ.शशिकांत शिंदे फित कापताना शेजारी अमित कदम, दीपक पवार व मान्यवर.(छाया-अनिल वीर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here