येवला – प्रतिनिधी
राजापूर येथील माजी सरपंच,येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक अंबादास गोविंदा विंचू (वय ८५) यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.त्यांच्या मागे मुलगा,दोन मुली,पत्नी,सुना,नातवंडे असा परिवार आहे.व्ही.एन.नाईक शिक्षण संस्थेचे संचालक तुळशीराम विंचू यांचे ते वडील होत.आज शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विंचूबाबा यांच्या निधनाने एक सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले असल्याची श्रद्धांजली माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.