जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांची २५६७ जयंती उत्साहात साजरी झाली. गत अडीच हजार वर्षांपूर्वी जगाला अहिंसेपासून दूर करण्याचे काम ज्या महामानवाने केले, त्या महामानवाची जयंती जगाच्या कानाकोपऱ्यात आनंदाने साजरी करण्यात आली. यंदाही पंचशील न
.
पंचशील नगर येथून निघणाऱ्या रॅलीला खा. बळवंत वानखडे, माजी लेडी गव्हर्नर डॉ. कमल गवई, पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी पंचशील ध्वज दाखवून रॅलीला प्रारंभ केला. रॅलीचे नेतृत्व भदंत शीलवंशकारा यांनी केले, तर रॅलीला प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती तथा नगरसेवक मंगेश मनोहरे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सचिव नयन मोंढे उपस्थित होते.
विश्वशांती रॅली पंचशील नगर, वडरपुरा लुंबिनी नगर, संजय गांधी नगर नंबर २, यशोदा नगर नंबर २, मिनी बायपास, यशोदा नगर चौक उत्तम नगर, शांतीनगर मार्गे भीम टेकडी येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. विश्वशांती रॅलीत पंचशीलनगर येथील महिला, पुरुष हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. विश्वशांती रॅलीला यशस्वी करण्याकरिता पंचशील नगर येथील युवक मंडळींनी सहकार्य केले. मंगळवारी महाभोजनदान करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी पंकज डोंगरे, रितेश मेश्राम, दादाराव माहुरे, गौरव वानखडे, सौरभ वानखडे, रंजना चेंडकापुरे, सविता खडसे, माया पाटील, साधना रामटेके, मीना चेंडकापुरे, सुनंदा मेश्राम, करिष्मा इंगोले, शोभा वानखडे, लता वानखडे, लता गणवीर, मनोरमा डोंगरे, लक्ष्मी वाघमारे, महानंदा मोंढे यांच्यासह पंचशीलनगर येथील युवक मंडळींनी सहकार्य केले.