हिंगोली शहरात पालिका प्रशासनाच्या वतीने मान्सूनपूर्व तयारीने वेग घेतला असून सर्व प्रथम सखल भागातील नाल्यांच्या साफसफाई सोबतच या भागात पाणी साचू नयेयासाठी आवश्यक उपाय योजना केल्या जात आहे. या शिवाय नदी काठच्या भागांवर पालिकेकडून विशेष लक्ष दिले जात आ
.
हिंगोली शहरातील महादेववाडी, मस्तानशहा नगर, बावनखोली यासह इतर भागात कयाधू नदीच्या काठी येतो. त्यामुळे पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास या भागात पाणी शिरल्याने नागरकींचे प्रचंड नुकसान होते. मागील वर्षीही या भागात मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर यावर्षी या भागात पाणी शिरून नागरीकांचे नुकसान टाळण्यासाठी पालिका प्रशासनाकडून या भागात नाल्यांची साफसफाई करून आवश्यक खोलीकरण केले जात आहे. शहरातील उताराच्या भागात येणारे पाणी नदीकडे जाण्यासाठीही मोठे नाले साफ केले आहेत.
दरम्यान, बुधवारी ता. २१ सकाळीच पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, शाम माळवटकर, प्रतिक नाईक, वर्मा, पंडीत मस्के, शिवाजी घुगे, संदीप घुगे, कांबळे यांच्या पथकाने शहरात पावसाळ्यामध्ये अधिक नुकसान होणाऱ्या भागाची पाहणी केली. या भागातील साफसफाई सोबतच नाल्या रुंद करण्यात आल्या असून पाणी जाण्यासाठी येणारे अडथळे दूर केले आहेत. या शिवाय इतर प्रभागांमधूनही हि कामे करण्यात आली आहेत.
शहरातील बावनखोली भागात आज साफसफाईची कामे युध्द पातळीवर सुरु केली आहेत. नागरीकांनीही त्यांच्या घरासमोरील नाल्यांमध्ये कचरा टाकू नये असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.