पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून एक चुटकी सिंदूरचे महत्व जगाला दाखवून दिले. पाकविरोधातील कारवाईनंतर सिंदूर हा शब्द जगभरात सर्च केला गेला. पण अजूनही काही लोकांना सिंदूरचे महत्व कळले नाही, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शह
.
अमित शहा यांनी मंगळवारी मुंबईच्या माधवबाग येथील लक्ष्मी नारायण मंदिराच्या 150 व्या उत्सवाला हजेरी लावली. यावेळी बोलताना त्यांनी ऑपरेशन सिंदूरसह वेगवेगळ्या मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, काही जण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केले? असा प्रश्न करतात. तर मोदींनी जीडीपी 10 क्रमांकावरून 4 नंबरवर आणला. आपली सुरक्षा भेदण्याचा करणाऱ्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. त्यांच्या नेतृत्वात देशाची सुरक्षा भक्कम झाली आहे. आपण अतिरेक्यांना जशास तसे प्रत्युत्र दिले. मला फ्रेन्च डिप्लोमॅट भेटले. मी त्यांना मागील 10 वर्षांत काय बदलले असा प्रश्न केला. त्यावर त्यांनी मोदींनी भारताच्या पासपोर्टची किंमत वाढवल्याचे सांगितले.
सध्या कोणत्याही देशात जा, आपले हसत-हसत स्वागत होते. मोदींनी 550 वर्षांपासून तंबूत राहणाऱ्या प्रभू श्रीरामांना मंदिरात आणले. काशी विश्वेश्वर कॉरिडोर बनावला. योग व आयुर्वेद जगभरात पोहोचवला. हे सर्व परिवर्तन मोदींनी केले.
काही लोकांना सिंदूरचे महत्व कळलेच नाही
अमित शहा यांनी ऑपरेशन सिंदूरवरही भाष्य केले. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून मोदींनी एक चुटकी सिंदूरचे महत्व संपूर्ण जगाला दाखवले. त्यानंतर गुगलवर सिंदूर हा शब्द सर्वाधिकवेळा सर्च केला गेला. तब्बल 10 कोटी लोकांनी हा शब्द सर्च केला. पण त्यानंतरही काही लोकांना सिंदूरचे महत्व अद्याप कळाले नाही, असे ते म्हणाले.
लक्ष्मी नारायण ट्रस्टचे केले कौतुक
अमित शहा यांनी लक्ष्मी नारायण मंदिराच्या ट्रस्टींचेही कौतुक केले. ते म्हणाले, एखादी संस्था तब्बल 150 वर्षे चालवणे सोपी गोष्ट नाही. मी जुन्या संस्था चालवल्या आहेत. पण इथे मुंबईत एवढी मोठी संस्था चालवणे सोपे नाही. त्यामुळे माधवबागच्या ट्रस्टींचे मी कौतुक करतो.1875 साली इंग्रजांच्या काळात मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी एखादी धार्मिक संस्था उभी करणे निश्चितच सोपे नव्हते. अनेकांना माहिती नसेल पण माझा जन्म मुंबईचा आहे. मी या मंदिरात अनेकदा आरतीसाठी येत होतो. त्यावेळी येथे एक वाडा होता. एक हॉल होता. तिथे कमी पैशात लग्न लावले जात होते. त्यासाठी ही संस्था मदत करत होती. या दीडशे वर्ष जुन्या संस्थेने शेकडो मध्यमवर्गीयांच्या अडचणी दूर केल्या, असे ते म्हणाले.