राजकारण हा शक्य व अशक्यतेचा एक क्लिष्ट खेळ आहे. रणनीती, सत्ता व सामाजिक आकांक्षांचा मेळ साधत सातत्याने एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळेच राजकारणात कुणीच कुणाचा कायमस्वरुपी शत्रू किंवा मित्र नसतो असे म्हटले जाते. सांगायचे असे की,
.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडियन एक्सप्रेसच्या एक्सप्रेस अड्डा या कार्यक्रमात बोलताना हे विधान केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार हे दोघेही संवादात चांगले नाहीत. अर्थात हे दोघे माझ्या या मताविषयी मला माफ करतील हे मला ठावूक आहे. पण हे दोघेही संवादात तेवढे चांगले नाहीत हे खरे आहे. याऊलट शरद पवारांच्या अनेक गोष्टी मला आवडतात. पण काही गोष्टी अशाही आहेत की, ज्या मी स्वीकारत नाही. पण मी त्यांच्या सातत्याचे कौतुक करतो. या वयातही ते जिंकले, हरले किंवा परिस्थिती कशीही असली तरी ते काम करत राहतात, असे ते म्हणाले.
गत काही महिन्यांपासून एकनाथ शिंदे महायुतीत नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातच फडणवीस यांनी हे विधान केल्यामुळे सत्ताधारी महायुतीत सर्वकाही ठिकठाक आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
लव्ह जिहादवरही भाष्य
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी लव्ह जिहादच्या वादग्रस्त मुद्यावरही भाष्य केले. ते म्हणाले, लव्ह जिहाद या मुद्यावर अनेकदा चर्चा होती. पण काही जिल्ह्यांत प्रेम संबंधांच्या आडून शोषण होण्याची प्रकरणे समोर आली आहेत. अनेक जिल्ह्यांत लव्ह जिहाद ही वास्तविकता आहे. पण यावरील चर्चा पाहता अनेकदा ती अतिशयोक्ती वाटते. पण काही जिल्ह्यांत ही वस्तुस्थिती आहे.
प्रत्येक प्रकरणांत चिंता करण्याची गोष्ट नसते. पण काही पॅटर्नमुळे चिंता वाढली आहे. मी आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहांच्या विरोधात नाही. पण जेव्हा मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांचे शोषण केले जाते, तेव्हा तो एक गंभीर मुद्दा असतो.’ फडणवीस यांच्या मते, या प्रकरणावरील त्यांची सार्वजनिक विधाने तेव्हाच सुरू झाली जेव्हा विश्वासार्ह घटना उघडकीस आल्या. ते म्हणाले, ‘अशी प्रकरणे उघडकीस आली तेव्हा मी त्याबद्दल बोलू लागलो.’
व्होट जिहादही एक पॅटर्न होता
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी भारताच्या लोकशाही संरचनेपुढील संभाव्य धोक्यांवरही उघडपणे भाष्य केले. ते म्हणाले, ‘मोठ्या संख्येने तरुण आयसीसमध्ये का सामील होत आहेत? अल्पसंख्याकांचे कट्टरपंथीकरण हे एक वास्तव आहे. तुम्ही वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करू शकत नाही. लव्ह जिहादप्रमाणेच महाराष्ट्रात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीवेळी व्होट जिहादचाही एक पॅटर्न होता.’
हे ही वाचा…
ठाकरे गटाचा भाजपवर हल्लाबोल:’चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था’ म्हणणाऱ्या अमित शहांना जमिनीवरची हकीकत माहीत आहे का?
मुंबई – अमित शहा म्हणतात, भारत जगात चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला! पण बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मनरेगासाठी निधी नाही, याला जबाबदार कोण? मोदी सरकारच्या ‘विकासाच्या गप्पा’ आणि जमिनीवरील वास्तव यात मोठा फरक आहे, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे. वाचा सविस्तर