IPL 2025 : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाब किंग्सने आयपीएल 2025 च्या क्वालिफायर 1 सामन्यात धडक दिली आहे. यासह पंजाब किंग्स सध्या पॉईंट्स टेबलमध्ये टॉपवर आहे. मागच्या वर्षी कोलकाता नाईट रायडर्सने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात आयपीएल 2024 चे विजेतेपद जिंकले होते. सोमवारी त्या विजयाला एक वर्ष पूर्ण झालं असून सोमवारी केकेआरने या वर्षपूर्तीच्या एक फोटो शेअर केला. मात्र यावरून लोकांनी केकेआरला ट्रोल केलं आहे.
मागच्यावर्षी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलचे विजेतेपद जिंकले होते. फायनलमध्ये सनरायजर्स हैदराबादला पराभूत करून केकेआरने आयपीएलमधील त्यांच दुसरं विजेतेपद पटकावलं होतं. मात्र त्यानंतर ट्रॉफी विजेत्या कर्णधाराला केकेआरने रिलीज केले. अशी माहिती मिळत होती की फ्रेंचायझी आणि श्रेयसमध्ये काही मतभेद आहेत. अखेर श्रेयस जेव्हा मेगा ऑक्शनमध्ये आला तेव्हा पंजाब किंग्सने त्याच्यावर 26.75 कोटींची बोली लावून त्याला करारबद्ध केलं. श्रेयस अय्यर हा आयपीएलच्या इतिहासातील एकमेव कर्णधार आहे, ज्याने त्याच्या नेतृत्वात आयपीएलमधील तीन संघांना प्लेऑफमध्ये पोहोचवलं. यात दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्सचा समावेश आहे. सोमवारी केकेआरने आयपीएल 2024 च्या विजयला वर्षपूर्ण झाल्याबद्दल केलं पोस्ट शेअर केली. मात्र त्यात कुठेही त्यांनी माजी कर्णधार श्रेयस अय्यरचा समावेश केला नाही. यावरून फॅन्स केकेआरवर भडकले आहेत.
केकेआरने शेअर केली पोस्ट :
केकेआरने एक ग्राफिकल पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये संघातील प्रमुख खेळाडूंचा समावेश होता. यात श्रेयस अय्यरच्या फोटोचा समावेश करण्यात आला नाही. कोलकाताने केवळ त्या खेळाडूंना निवडले जे अजूनही त्यांच्या संघाचा भाग आहेत. यात सुनील नरेन, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, रिंकू सिंह यांचा समावेश आहे. परंतु अय्यरला या फोटोतून वगळल्यामुळे चाहते फारच रागावले.
A day that will live in our hearts, forever
Celebrating 1 year of our third IPL crown pic.twitter.com/EqAzfse5jK
KolkataKnightRiders (KKRiders) May 26, 2025
A day that will live in our hearts, forever
Celebrating 1 year of our third IPL crown pic.twitter.com/EqAzfse5jK
— KolkataKnightRiders (KKRiders) May 26, 2025
काय म्हणाले फॅन्स?
कोलकाताच्या त्यांच्या विजयाच्या वर्षपूर्तीच्या पोस्ट केल्यावर म्हंटले की, ‘इतकी खराब कामगिरी केल्यानंतरही तुम्ही १ वर्षाचा वर्धापन दिन साजरा करता आणि एवढंच नाही तर तुमच्या विजेत्या कर्णधाराला फोटोतून वगळता हे किती निर्लज्जपणाचे आहे’. एका नेटकाऱ्याने म्हटले की, ‘त्या माणसाने सगळं काही दिलं.. आणि तुम्ही त्याचा उल्लेखही करू शकत नाही? केकेआर, फ्रेममध्ये अय्यर कुठे आहे?’