Devendra Fadnavis Criticizes Rahul Gandhi For His Statement On Swattryveer Savarkar | स्वातंत्र्यवीर सावरकर यांना काही मूर्ख व्यक्ती माफी वीर म्हणतात: नाव न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधींवर निशाणा – Mumbai News

0



स्वातंत्र्यवीर सावरकर यांना काही मूर्ख व्यक्ती माफी वीर म्हणतात. मात्र, न्यायालयाने अशा लोकांना फटकारले हे बरे झाले, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सावरकरांना माफीवर

.

स्वातंत्र्यवीर सावरकर हे अंदमान मध्ये शिक्षा भोगत होते. तेव्हा जेलची परिस्थिती अतिशय वाईट होती. अंदमानात अनेकांवर त्याचा परिणाम झाला होता. मात्र स्वातंत्र्यवीर सावरकरांनी यांच्यामध्ये कोणतीही निराशा दिसली नाही. ते इतरांना पीटिशन करण्यासाठी आणि लवकर सुट्टी मिळावी यासाठी मदत करत होते. मात्र, तरीदेखील काही मूर्ख लोक त्यांना माफीवर म्हणत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने घेतल्या जात असतील तर ते चुकीच आहे. त्यांना आता अक्कल येईल, असे मला वाटते. मात्र हे बोलणे बालबोध असल्याचे देखील फडणवीस यांनी म्हटले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांची देशभक्ती आणि हिंदुत्व प्रज्वलित झाले तर आपले काही खरे नाही. हे यांना माहित आहे. त्यामुळेच ते असे बोलत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमानिमित्त देवेंद्र फडणवीस बोलत होते.

मराठी भाषेला अधिक समृद्ध करण्याचे काम

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदुत्व हे विज्ञाननिष्ठ होते. ते व्यक्ती नव्हे तर एक संस्था आहेत. त्यांच्या नावाने संशोधन केंद्र सुरू होत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मात्र, यासाठी आम्ही निधी कमी पडू देणार नाही, असे देखील आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे. सावरकरांनी मराठी भाषा प्रमाण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. विधिमंडळ, चित्रपट, निवृत्ती वेतन असे अनेक शब्द त्यांनी मराठी भाषेला देऊन भाषेला अधिक समृद्ध करण्याचे काम केले असल्याचे देखील फडणवीस यांनी म्हटले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here