कोपरगाव : कोपरगाव शहराच्या लगत वाहत असणाऱ्या गोदावरी नदी किनारी असलेले राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांच्या नावाने असणाऱ्या मोनगिरी सेतू च्या डाव्या बाजूला गावात जाताना,श्री स्वामी समर्थ मंदिराच्या बाजूने /लगत खूप लांब असा घाट व त्याला नदीपात्राच्या आतपर्यंत पायऱ्या नगरपालिकेने बांधाव्यात / नवीन घाट बांधावा. अशी मागणी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केली आहे.
पाटील यांनी पुढे म्हटले आहे की पावसाळ्यामध्ये गोदावरी नदीला पाहिले पाणी आल्यानंतर शहर, तालुका तसेच परिसरातील महिला माता भगिनी मोठ्या प्रमाणात गोदावरी मातेची पूजा करायला येतात. आंघोळ करायला येतात.कोणी दर्शन घेऊन पायावर पाणी घेतात. अशा वेळी भाविकांना नदी पात्रात उतरताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.घाट पायऱ्या नसल्यमुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
त्याचप्रमाणे गणपती विसर्जनाच्या वेळी पालिका प्रशासन तात्पुरती व्यवस्था करते मात्र यादरम्यान बऱ्याचदा नदीला पूर असतो. भाविकांना गणपती बाप्पाचे विसर्जन नदीतच वाहत्या पाण्यात व्हावे अशी इच्छा असते. तसेच पौर्णिमा ,अमावस्या ,प्रदोष, श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात लोक त्या ठिकाणी आंघोळीला येतात तसेच शिर्डीलाही जाताना कोपरगाव मधून कावड भरून लोक पाई साईबाबांना जातात. कोपरगाव शहराला ऐतिहासिक असे महत्त्व प्राप्त आहे .कोपरगाव शहरात बेट भागात शुक्राचार्य भगवान व कचेश्वर भगवान यांचे मंदिर आहे. त्र्यंबकेश्वर प्रमाणे कचेश्वर मंदिरात सर्व धार्मिक विधी वर्षभर होऊ शकतात असे मानण्यात येते ,असे सांगण्यात येते .इतके महत्त्व या स्थानाला आहे.विधी केल्यानंतर बराच वेळा नदीमध्ये स्नान करावे लागते. विधी पूजा झाल्यानंतर स्नानासाठी योग्य अशी जागा अंघोळ करण्यासाठी नसल्याने ही विधी ची परंपरा लोकपावत चाललेली आहे. तरी आपला हा सांस्कृतिक वसा टिकण्यासाठी व पुन्हा इथे पूजाअर्चा सुरू होण्यासाठी नदीच्या विरुद्ध बाजूने शुक्राचार्य घाट करण्यात आलेला आहे त्याहून चांगला मोठा सुरक्षित घाट होणे खूप महत्त्वाचा आहे.
यामुळेही कोपरगाव शहरांमध्ये यातील ऐतिहासिक मंदिरांचे दर्शन घेण्यासाठी व नदीत अंघोळ करण्यासाठी ,पूजा करण्यासाठी लोकांची वरदळ वाढेल व छोट्या छोट्या व्यवसायिकांना व पुरोहितांनाही याचा उपयोग होईल .
शहरात नदीकिनारी स्वामी समर्थ मंदिराच्या बाजूला मोठ्या प्रमाणात सुंदर असा घाट होईल अशी जागा आहे .त्यामुळे जनतेच्या धार्मिक भावनांचा विचार करून नगरपालिकेने स्वामी समर्थ मदिराचे गुरू माऊली यांची परवानगी घेऊन तात्काळ सुंदर असा पक्का घाट बांधावा . त्याचप्रमाणे त्याला सुरक्षित असे संरक्षण कठडे बांधावेत ,जेणेकरून अपघातही होणार नाही . आणि या कामाचे तात्काळ नियोजन करून काम सुरु करावे अशी मागणीही पाटील यांनी भाविक आणि नागरिकांच्या वतीने नगरपालिकेला केली आहे.

