देवळाली प्रवरात महाविद्यालयीन दोन गटांच्या विद्यार्थ्यांचा राडा

0

राजकीय संघनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाग घेतल्याने वातावरण चिघळले; महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांवर ब्लेडने वार एकुण चार विद्यार्थी जखमी

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

                देवळाली प्रवरा येथिल एका वरीष्ठ महाविद्यालयात दोन गटात धुमचक्री उडाली असुन यात एका गटाने महाविद्यालयीन दोन विद्यार्थ्यावर ब्लेडने वार केले असुन महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरु झालेली धुमचक्री सोसायटी डेपो चौकात दोन्ही बाजुने 400 ते 500 चा जनसमुदाय एकमेकांवर चालुन येत होता.पोलीस वेळेवर पोहचल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या धुमचक्रीत चार जण जखमी झाले आहेत.हि धुमचक्री नाजुक कारणातुन घडल्याचे दबक्या आवाजात चर्चा सुरु होती.माञ या प्रकरणात दोन्ही गटाच्या बाजुने राजकीय हस्तक्षेप झाला आहे.राहुरी पोलीसांनी राञी उशिरा महाविद्यालया बाहेरील चार तरुणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

             याबाबत समजलेली माहिती आशी की, देवळाली प्रवरा येथिल कडू कदम वस्ती रोड लगत अहमदनगर येथिल नामवंत संस्थेचे  महाविद्यालयात आहे.याच महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विकास बाबासाहेब वाळके व निलेश उर्फ पप्पू सांगळे दोन विद्यार्थ्यामध्ये एकमेकांकडे पाहुन हसण्यावरुन वाद झाल्याचे फिर्यांदीत नमुद केले असले तरी हे प्रकरण नाजुक कारणातुन  झाले आसल्याने वाद विकोपाला जावुन दोन्ही गटाकडुन 400 ते 500 महाविद्यालयीन  विद्यार्थी व बाहेरील तरुण एकमेकांवर ताव खात होत होते.या विद्यार्थ्याच्या भांडणात पालक व मिञांनी  भाग घेतला.हे सर्व जण हातात काठ्या, दांडे,गज घेवून धावत आल्याने सोसायटी चौकातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद करुन घेतली. दिवसभर दुकाने बंदच ठेवण्यात आली.दोन्ही गटांची आक्रमकता पाहता.दंगलसद्रुष्य परीस्थिती निर्माण झाली होती.या बाबतची माहिती राहुरी पोलीसांना कळविण्यात आल्या नंतर पोलीस निरीक्षक मेघःशाम डांगे,पोलीस उप निरीक्षक सज्जन नाऱ्हेडा, पो.हे.काँ.प्रभाकर शिरसाठ, श्रीरामपूर येथिल दंगल नियंञण पथक घटनास्थळी दाखल झाले.पोलीस दाखल होताच दोन्ही गटाच्या मोहरक्यांची धरपकड करण्यास सुरवात केली.9 ते 10 जणांना पोलीसांनी ताब्यात घेवुन सरकारी वाहना द्वारे राहुरी पोलीस ठाण्यात नेऊन बसवुन ठेवण्यात आले.

               तीन महिण्यापुर्वी याच महाविद्यालयात टाकळीमिया परिसरातील विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या प्रांगणात एका शिक्षकास श्रीमुखात मारुन बेदम मारहाण केल्याच्या घटनेवर येथिल प्राचार्याने पडदा टाकल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची हिम्मत वाढत गेल्याने विद्यार्थ्यांच्या दोन गटात धुमचक्री होवुन दंगल सद्रुष्य परिस्थिती निर्माण झाली होती.

               निलेश उर्फ पप्पू सांगळे  या विद्यार्थ्याच्या बाजुने किरण उर्फ गण्या उत्तम पठारे,कार्तीक गणेश जाधव मयुर चक्रपाणी खैरे यांच्यासह  राजकीय संघटनेच्या पदाधिकारी व विद्यार्थ्यांचे नातेवाईक व मिञ हातात दांडके, काठ्या, गज, कुऱ्हाड घेवुन धावत आले.दुसऱ्या गटावर तटून पडले या मारहाणीत विकास बाबासाहेब वाळके, सत्यजित संभाजी देठे,मयुर राजेंद्र सिनारे,आदित्य बाळासाहेब ताजणे हे महाविद्यालयीन विद्यार्थी जखमी झाले आहेत. पोलीसांनी उघड्या डोळ्याने हातातील काठ्या,गज  पाहुनही डोळेझाक केल्याने या सर्वांन पैकी एकास हि अटक न केल्याने या सर्वांना पोलीसांचा आशिर्वाद आहे का? असा प्रश्न यावेळी निर्माण झाला.

                महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या दोन्ही गटाकडुन राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप करुन पोलीस ठाण्यात ठाण मांडुन बसले होते.त्यामुळे सायंकाळ पर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.दोन गटातील धुमचक्री कोणाच्या तरी जीवावर बेतली असती.या घटने नंतर देवळाली प्रवरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

             राहुरी पोलीस विकास वाळके याच्या फिर्यादी वरुन किरण पठारे(रा.देवळाली प्रवरा),निलेश सांगळे,कार्तीक जाधव,मयुर खैरे (रा.टाकळीमिया ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास पोलीस उप निरीक्षक  सज्जन नाऱ्हेडा  हे करीत आहे.

विद्यार्थीनीच्या आईची आत्महत्येची धमकी!

            महाविद्यालय परिसरात दोन गटात धुमचक्री होवुन एका विद्यार्थ्यावर ब्लेडने वार झालेले असताना या महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेणारी मुलगी परीक्षा देण्यास महाविद्यालयात जाते म्हणुन घरुन महाविद्यालयात आली.टाकळीमिया रोड लगत राहणाऱ्या याच महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणा बरोबर सैराट झाली.याची कुणकून महाविद्यालयीन विद्यार्थींनीच्या घरी लागताच तरुणीच्या आईने महाविद्यालयातील शिक्षकांनी माझी मुलगी आणुन द्यावी अन्यथा महाविद्यालयासमोर आत्महत्या करीन असा इशारा देताच धुमचक्रीतील काही विद्यार्थ्यांचा शोध घेत पोलीस महाविद्यालयात पोहचले.पोलीसांनी सैराट झालेल्या दोघांचे मोबाईल नंबर घेवुन संपर्क केला असता.या विद्यार्थीनीने मी स्वतः पळून आले आहे.आम्ही दोघांनीहि विवाह केला आहे. सायंकाळ पर्यंत घरी पोहचतो असे सांगितल्याने शिक्षकांचा जीव भांड्यात पडला.माञ तरीही विद्यार्थीनीच्या आईने माञ मुलीच्या सैराट होण्यामागे शिक्षक जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here