शिक्षण व्यवस्थेत मुख्याध्यापकाचा अभिमन्यू झाला आहे – आ. विक्रम काळे

0

नाशिक प्रतिनिधी : मुख्याध्यापक शिक्षण व्यवस्थेचा मुख्य कणा व सर्वेसर्वा असुनही त्यांचा या व्यवस्थेमध्ये अभिमन्यू झाला असल्याची खंत शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी व्यक्त केली . नाशिक जिल्ह्यातील मुख्याध्यापकांचे एक दिवशीय उदबोधन शिबीर नुकतेच संपन्न झाले. याप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्यातील मुख्याध्यापकांसाठी उदबोधन शिबीर रावसाहेब थोरात सभागृहात संपन्न झाले . शिबीरासाठी प्रमुख वक्ते व अतिथी शिक्षक आमदार विक्रम काळे मराठवाडा विभाग.  माजी आमदार सुधीर तांबे, विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ .बी बी चव्हाण, शिक्षणाधिकारी – प्रविण पाटील, उपशिक्षणाधिकारी उदय देवरे व  गणेश फुलसुंदर, मुख्याध्यापक महामंडळाचे राज्याचे अध्यक्ष केरूभाऊ ढोमसे ,पे युनिट अधिक्षक नितिन पाटील, शिक्षणकार्यालय अधिक्षक  सुधिर पगार, लेखाधिकारी राजेश बुवा , व्याख्याते बी बी पाटील,  नितीन पाटील जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस के सावंत, सचिव एस बी देशमुख, उपाध्यक्ष प्रदिप सांगळे डॉ . अनिल माळी ,अशोक कदम, गोरख कुलधर,  बी के नागरे, भागीनाथ घोटेकर, किशोर पालखेडकर, एस ए पाटील , योगेश पाटील, डी .एस ठाकरे, जाधव आर .टी, सुनिल फरस, दीपक गायकवाड, बी एन देवरे, सौ .पदमा पाठक, बी .डी गांगुडे व पदाधिकारी उपस्थित होते . आमदार  विक्रम काळे यांनी मुख्याध्यापकांची भुमिका अतिशय कठीण आहे . शिक्षक बालक चालक अधिकारी यांच्या मधला दुवा आहे यात त्यांचे कौशल्य पणाला लागते असे सांगितले .

बी बी चव्हाण यांनी मुख्याध्यापकांचे कर्तव्याची,जबाबदरीची,अस्तित्वाची,अधिकाराची व आव्हानांची जाणीव करून दिली. मुख्याध्यापकांसमोर असणाऱ्या विविध समस्या, अडचणी, विविध आव्हाने, उपाययोजना इ. बाबतीत मार्गदर्शन केले . याचबरोबर दिवसभरामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा , संचमान्यता, विद्यार्थी संख्या, पवित्र पोर्टल, टप्पा अनुदान, नविन पेन्शन योजना, प्रलंबीत बीले,लेखापरिक्षण, शाळेतील विविध कामे, गुणवत्ता इ .बाबत चर्चा करण्यात आली . कार्यक्रमाचे नियोजन एस बी देशमुख यांनी केल . प्रास्ताविक एस के सावंत, सुत्रसंचालन सौ . पदमा पाठक यांनी केले तर आभार प्रदिप सांगळे सर यांनी मानले. जिल्ह्यांतून एक हजारहून अधिक मुख्याध्यापक हजर होते. असे उद्बोधन शिबीर दोन दिवसांचे व्हावे अशी मागणी अनेक मुख्याध्यापकांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here