राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. वास्तविक परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. अशा प्रकार ट्रोल करणाऱ्यांवर पंतप्रधान नरे
.
भारत आणि पाकिस्तान यांच्या सुरू असलेल्या तणाव स्थिती दरम्यान सरकारच्या वतीने करण्यात येणाऱ्या कारवाईची माहिती देण्यासाठी केंद्र सरकारने लष्कराच्या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत लष्करी महिला अधिकाऱ्यांसोबत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी देखील या निर्णयांची माहिती दिली. या संदर्भात विक्रम मिस्त्री यांच्या विषयी काही आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्या. यावरून आता देश त्यांच्या पाठीशी असल्याच्या भावना व्यक्त करणाऱ्या अनेक पोस्ट करण्यात येत आहे. यामध्ये आता रोहित पवार यांनी देखील एक पोस्ट केली असून त्यांनी यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कारवाई नक्कीच करतील, यावर विश्वास व्यक्त केला आहे.
मोदी साहेब हे या ट्रोलर्सवर नक्की कठोर कारवाई करतील, असा विश्वास
पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पाकिस्तानला उघडं पाडण्याचं काम परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री हे अत्यंत प्रभावीपणे करत आहेत. पण त्यांनी शस्त्रसंधीची माहिती देताच चवताळून पिसाळल्यागत उठलेल्या ‘भक्त’मंडळींकडून मिस्त्री आणि त्यांच्या कुटुंबातील महिलांबाबत करण्यात येत असलेली आक्षेपार्ह टिप्पणी अत्यंत संतापजनक आहे. वास्तविक शस्त्रसंधीचा निर्णय हा प्रशासनात काम करणाऱ्या मिस्त्री यांचा नाही तर राजकीय पातळीवर सरकारकडून घेतला गेला. तो केवळ जाहीर करण्याची जबाबदारी मिस्त्री यांच्यावर होती, परंतु आपल्याच नेत्याविरोधात बोलण्याची वेळ येताच नांगी टाकणारे हे ट्रोलर्स मिस्त्री आणि त्यांच्या कुटुंबियांना टार्गेट करतायेत. मिस्त्री यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांचं मनोबल खच्ची होऊ नये यासाठी या ‘अंधभक्त’ ट्रोलर्स आणि त्यांच्या पाठीशी असलेल्या मेंदूवर सरकारने कठोर कारवाई करावी! ही बाब सरकारपर्यंत पोचली की नाही माहित नाही, पण सरकारपर्यंत पोचल्यावर मोदी साहेब हे या ट्रोलर्सवर नक्की कठोर कारवाई करतील, असा विश्वास आहे.