शालेय विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून करावा लागतो प्रवास

0

साकत परिसरातील पीके पाण्यात, पंचनामे करण्याची मागणी 

 जामखेड तालुका प्रतिनिधी – जामखेड तालुक्यातील साकत परिसरात मुसळधार पावसामुळे नदी, ओढ्यांनी रौद्र रूप धारण केले होते. यामुळे अनेक वाड्या व वस्त्यांचा संपर्क तुटला होता. तसेच शेतीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पीके पाण्याखाली गेले आहेत.  साकत कोल्हेवाडी कडभनवाडी जोडणारा लेंडी नदीवर असलेला पुल आज झालेल्या अतिवृष्टीमुळे पाण्याखाली गेला यामुळे लोकांचा संपर्क तुटला होता सकाळी सात नंतर पाणी ओसरल्यावर वाहतूक सुरू झाली. शालेय विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून दररोजच प्रवास करावा लागत आहे. पुलाची उंची वाढवावी व परिसरातील पिकांचे पंचनामे करावेत अशी मागणी होत आहे. 

परिसरात जून महिन्यांपासून पाऊस आहे. पेरणी जून मध्ये पेरणी झाली पण जूनपासून रोजच पाऊस आहे. फक्त आठ दिवस पावसाने खंड दिला. परत पाऊस सुरू झाला रात्री परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला यामुळे लेंडी नदीला पुर आल्यामुळे संपर्क तुटला होता. सकाळी पाणी थोडे कमी झाल्याने वाहतूक सुरू झाली शालेय विद्यार्थ्यांना दररोजच जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. पुलाची उंची वाढवावी अशी मागणी होत आहे तसेच परिसरातील पिकांचे पंचनामे करावेत अशीही मागणी होत आहे. 

सध्या जामखेड सौताडा महामार्गाचे काम खुपच संथ गतीने सुरू आहे. यातच सौताडा जवळील पूल काही दिवसांपूर्वी वाहून गेला होता. तसेच रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे रस्ता वाहतुकीस योग्य नाही त्यामुळे अनेक वाहनधारक तसेच बीड, पाथर्डी कडे जाणारे वाहने पिंपळवाडी मार्गी वांजरा फाटा मार्गी जातात यात अनेक बस पण याच मार्गी जातात पण आता पुल खचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. तसेच साकत कोल्हेवाडी कडभनवाडी यांना जोडणारा लेंडी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे या गावांचा संपर्क तुटला होता. 

साकत कोल्हेवाडी मार्गावर साकत जवळ पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच वराट वस्ती, कडभनवाडी या ठिकाणचा संपर्क तुटला आहे. लेंडी नदी व वांजरा नदीला पुर आल्यामुळे अनेक ठिकाणचा संपर्क तुटला होता. सकाळी पाणी कमी झाल्याने वाहतूक पूर्ववत सुरू झाली. 

परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला यामुळे नदीला पूर आला होता यातच साकत जवळील लेंडी नदीवर पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. शालेय विद्यार्थी व नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. पुलाची उंची वाढवावी अशी मागणी होत आहे. 

 पहाटे झालेल्या पावसामुळे नदीला पुर आला होता यातच कडभनवाडी, कोल्हेवाडी, वराट वस्ती, कवडवाडी परिसरातील नागरिक यांचा संपर्क तुटला होता. अनेक दुधवाले व विद्यार्थी अडकले होते. सकाळी पाणी कमी झाल्यावर वाहतूक सुरू झाली. काही विद्यार्थी परत माघारी गेले यामुळे पाऊस झाला की, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ताबडतोब पुलाची उंची वाढवावी व परिसरातील पिकांचे पंचनामे करावेत अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here