ज्ञानज्योतीमुळेच ज्ञानदानाची कवाडे खुली केली.

0

सातारा : ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील क्रांतिकारक योगदान आहे.त्यामुळेच ज्ञानदानाची कवाडे खऱ्या अर्थाने सर्वांसाठी खुली झाली आहेत.असे प्रतिपादन बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांनी केले.

      येथील छ.प्रतापसिंह महाराज (थोरले) नगरवाचनालयात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.तेव्हा प्रमुख अतिथी म्हणुन   पाटणकर वाचनालयाचे संचालक बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ट साहित्यिक संचालक डॉ.राजेंद्र माने होते. यावेळी अरुण माने,एच.व्ही. वाळंबे आदी मान्यवर उपस्थीत होते.

                   अनिल वीर म्हणाले, “मुलींसाठी व अस्पृश्यांसाठी शाळा चालू करणारे पहिले भारतीय फुले दाम्पत्य होय.त्यांनी शिक्षणात नवे पर्व सुरु केले होते.मुलींच्या शाळांच्या पहिल्या भारतीय शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणून ज्ञानज्योती यांचे स्थान आहे.शाळांसाठी अभ्यासक्रम नियोजन (curriculum planning) करणाऱ्या व अभ्यासक्रम तयार करून राबविणाऱ्या पहिल्या शिक्षणतज्ञही त्या होत्या. अभ्यासक्रम नियोजन  हा विषय आज शिक्षणशास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिकवला जातो.

सर्व शैक्षणिक कार्य विनामूल्य करणाऱ्या पहिल्या अध्यापिका होत्या.शिक्षणामध्ये शारीरिक शिक्षणाचा अंतर्भाव करणाऱ्या पहिल्या अध्यापिका होत्या. शाळेत कथाकथनाची खास तासिका ठेवणाऱ्या व आनंददायी शिक्षणाच्या पहिल्या प्रवर्तक  राज्य सरकारने आनंददायी शिक्षण ही योजना अलीकडे राबवण्यास घेतली आहे.त्यांनी बहुजनांसाठी देशातील पहिली “नेटिव्ह लायब्ररी” काढली होती.

त्यांनी पहिले अध्यापक प्रशिक्षण केद्र “नॉर्मल स्कूल” काढले व चालवलेही होते.त्यातूनच “फातिमा शेख” ही पहिली मुस्लीम शिक्षिका तयार करण्याचे श्रेयसुद्धा सावित्रीबाई व जोतिबा यांना जाते.पुणे व आजूबाजूंच्या १८ शाळांचे संचालन करणाऱ्या पहिल्या संचालिका होत्या. विद्यार्थ्यांना गणवेश पुरविणाऱ्या पहिल्या संचालिकाही होत्या. सह-शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या पहिल्या शिक्षण-तज्ञ. त्यासाठी वेताळ-पेठेत सह-शिक्षण देणारी शाळा काढली होती.शालेय विद्यार्थ्याना शिक्षण घेता यावे. यासाठी त्यांना विद्यावेतन (स्कॉलरशिप) देणे सुरु करणाऱ्या पहिल्या अध्यापिका. गरीब घरांतील मुले शाळेत यावीत म्हणून त्यांना खायला देण्याचा उपक्रम राबविणाऱ्या पहिल्या अध्यापिका. सरकार अलीकडे हा उपक्रम राबवीत आहे.प्राथमिक स्तरापासून इंग्रजीचा पुरस्कार करणाऱ्या व राबविणाऱ्या पहिल्या अध्यापिका.विद्यार्थ्यांचे शिक्षण व त्याचे महत्त्व  विद्यार्थ्यांच्या समस्याविषयी पालकांचे समुपदेशन करणाऱ्या पहिल्या समुपदेशक.विकसित देशांत शाळाशाळांत समुपदेशक असणे आवश्यक आहे.सरकार तर्फे आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेल्या पहिल्या भारतीय अध्यापिका ठरल्या.विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी घरी विनामूल्य वसतिगृह चालवणारे पहिले दाम्पत्य होते.विधवा स्त्रियांसाठी वसतिगृह काढणारे पहिले दाम्पत्य.फुले दाम्पत्त्याने सर्वप्रथम प्रौढांसाठी प्रशिक्षण वर्ग काढले होते.शेतकरी, कामकरी यांच्यासाठी त्यांनी रात्रशाळा काढल्या होत्या.सावित्रीबाई व जोतीराव यांनी आपल्या शाळेत शिकलेल्या सी.धुराजी आप्पाजी व रानबा यांना शिक्षक बनवले होते. याप्रकारे भारतात दलित व्यक्तीना सर्वप्रथम शिक्षक बनविण्याचा मान फुले दाम्पत्यांना मिळतो. आधुनिक, वैज्ञानिक, मानवतावादी व धर्मनिरपेक्ष शिक्षणाच्या पहिल्या पुरस्कर्त्या.

आधुनिक काव्याच्या जनक. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले होते. अस्पृश्यांना स्वत:च्या घरची पाण्याची विहीर व हौद खुला करून देणारे पहिलेच दाम्पत्य ठरले होते.पतीच्या चितेला अग्नी देऊन सर्व अंत्यसंस्कार करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होत्या. सत्याशोधक समाजाच्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या.१८९६ साली दुष्काळात पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बायांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून सावित्रीबाईंनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. १८७६ च्या दुष्काळात उपासमार झेलणाऱ्या हजारो मुलांसाठी मातृप्रेमाने ५२ अन्नछत्रे चालवणारी एकमेव माता.१८९६ च्या दुष्काळातही अशी अन्नछत्रे चालविली.बहुजनांची चळवळ चालविणाऱ्या पहिल्या महिला पुढारी.भारतीय महिला मुक्ती व महिला सबलीकरण आंदोलनाच्या पहिल्या नेत्या

महानायिका ठरल्या होत्या.” याशिवाय,वीर यांनी विविध विषयांवर भाष्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here