मृत्यूनंतरही यातना; ओढ्यावर पूल नसल्याने मृतदेह ट्रॅक्टरमधून स्मशानभूमीत नेण्याची वेळ

0

IMG-20250528-WA0027.jpg

आदर्की : फलटण पश्चिम तालुक्यात सहा दिवस संततधार पावसामुळे सर्व तलाव, बंधारे, ओढे, नाले भरून वाहत असताना आदर्की खुर्द येथे वृद्ध महिलेचे निधन झाले; पण स्मशानभूमी ओढ्याच्या पलीकडे असल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह ट्रॉलीत ठेवून ओढ्याच्या पलीकडे नेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले; पण देश स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही ओढ्यावर पूल न बांधल्याने आदर्की खुर्द येथे मृत्यूनंतर यातना सहन कराव्या लागत आहेत.

आदर्की खुर्द हे तीन हजार लोकसंख्येचे गाव. या गावात १९९० दरम्यान मुख्य ओढ्याच्या पलीकडे अंत्यसंस्कार करण्यासाठी शेड बांधले; पण दहा वर्षे या शेडमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येत नव्हते; पण अतिवृष्टीमुळे एका महिलेचे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर पंधरा वर्षांनंतर मुख्य ओढ्यावर पूल बांधण्यात आला; पण दुसऱ्या लेंढवळीच्या ओढ्यावर पूल बांधला गेला नाही. या ओढ्यात पावसाळ्यात गाळ साठतो तर मोठा पाऊस झाला तर पूर येतो, त्यामुळे ग्रामस्थ, महिला, विद्यार्थ्यांना ये-जा करताना त्रास होतो तर गावातील कोणाचा पावसाळ्यात मृत्यू झाल्यास रस्ता व पूल नसल्याने सकाळी अंत्यसंस्कार करावे लागतात.

आदर्की परिसरात चार दिवस संततधार पावसामुळे ओढे नाले भरून वाहत आहेत. यातच एका महिलेचा वृद्धापकाळाने निधन झाले. सर्व पाहुणे, ग्रामस्थांच्या उपस्थित घरापासून मृतदेह खांद्यावर ओढ्यापर्यंत नेण्यात आला व ओढ्याला पाणी असल्याने तेथून मृतदेह टॅक्टर ट्रॉलीत खांदेकरी व तरुण बसून गेले; परत मृतदेह ट्रॉलीतून खांद्यावर घेऊन नवीन बांधलेल्या शेडमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

ओढ्यावर पूल नसल्याने मृतदेह खांद्यावरून दोनदा खाली ठेवून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीतून पलीकडे न्यावा लागल्याने आदिवासी गावे विकसित झाली आहेत; पण आदर्की खुर्द गावाला स्मशानभूमीत जाण्यासाठी पूल, रस्ता नाही हे दुर्दैव आहे. अधिकारी व लोकप्रतिनिधींनी पाहणी करून यावर मार्ग काढावा. -सतीश निंबाळकर, माजी सरपंच, आदर्की खुर्द 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here