अनिल वीर सातारा : बुधवार दि.२० रोजी विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे.शिवाय, शनिवार दि.२३ रोजी दुपारपर्यंत सर्व निकाल हाती येऊन स्पष्ट होणार आहेतच ! तेव्हा पक्ष, आघाडी व युती यातुन बाहेर येऊन मित्रपक्ष अबाधित ठेवुया.
कुठलाच कार्यकर्ता हा चुकीचा नसतो. जो तो त्याच्या आपल्या आवडत्या नेत्याच्या वक्तृत्वावर, कार्यशैलीवर व विचारसरणीने प्रेरित झालेला असतो. त्यामुळे त्या नेत्याचा समर्थक व प्रिय असतो. पण त्या समर्थनाच्या नादात अजाणतेपणी तो आपले मित्र, जवळचे नातेसंबंध, आपल्या सुखदुःखात नेहमी मदत करणारी जवळची माणसं यांना सुद्धा शत्रू, दुष्मण समजू लागतो.
त्यामुळे जो निकाल लागेल तो लागेल. मग कोणीही निवडणून येवो. तो निकाल मान्य करून आलेल्या निकालामुळे आपले वैयक्तिक हितसंबंध बिघडू नयेत. याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. कोणालाही काही वाईट बोलून आपले हितसंबंध बिघडवू नका. किंवा एकमेकांना चमचे वगैरे काहीच म्हणू नका. सगळ्यांना मित्रच म्हणा, मित्रच समजा. शेवटी कोणीतरी एकच उमेदवार जिंकणार बाकीचे हारणार. हार जीत ही होत राहणारच. आपला मात्र एकच पक्ष आयुष्यभर राहणार आहे तो म्हणजे मित्रपक्ष.