जामखेडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल.           

0

जामखेड तालुका प्रतिनिधी  – दुकानामध्ये सामान घेण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीला गोडाऊन मध्ये नेऊन मित्राच्या मदतीने मुलीचे हात व तोंड दाबुन तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह दोन जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कर्जत जामखेडचे आ. रोहीत पवार यांनी या घटनेबाबत सोशल मिडियाच्या माध्यमातून तीव्र संताप व्यक्त केला असुन आरोपीला अटक न झाल्यास प्रशासनाला परवडणार नाही असे देखील म्हंटले आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की जामखेड तालुक्यातील एका गावात रविवार दि २९ जुन रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन मुलगी व तीची आई दुकानात आसताना त्या ठिकाणी एका अल्पवयीन आरोपी मित्रासह दोघेजण दुकानात आले. अल्पवयीन मुलगा हा अल्पवयीन फीर्यादी मुलगी हीच्या वर्गातीलच आहे. यानंतर सामान देण्यासाठी फीर्यादी अल्पवयीन मुलगी व आरोपी हे त्यांच्या घराजवळील गोडाऊन मध्ये आले. यावेळी अल्पवयीन मुलाने आणि दुसऱ्या आरोपीने पिडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला व घटनास्थळाहुन पळुन गेले. यानंतर सदरचा घडलेला प्रकार पिडीत अल्पवयीन मुलीने आपल्या आईला सांगितला व त्यानंतर पिडीत मुलीच्या आईवडिलांनी जामखेड पोलीस स्टेशनला धाव घेतली.

याप्रकरणी पिडीत अल्पवयीन मुलीने जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून एका तरूण वय २५ व  त्याचा मित्र एक अल्पवयीन  असे  दोघांनवर जामखेड पोलीस स्टेशनला पोक्सो व अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मधिल अल्पवयीन मुलास अहिल्यानगर येथील बालसुधारगृहात पाठवण्यात आले असुन दुसरा आरोपी  हा अद्याप फरार आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव या करीत आहेत.एक आरोपी पोलिसांनी लवकर अटक केले नाही तर गाव बंदचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे 

आ. रोहीत पवार यांनी केला संताप व्यक्त

याबाबत आ. रोहीत पवार यांनी फेसबुक पोष्ट करित म्हंटले आहे की माझ्या मतदारसंघात एका व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलीसोबत झालेला अत्याचाराचा प्रकार हा अत्यंत घृणास्पद आणि किळसवाणा असून या कृत्याचा मी तीव्र निषेध करतो. यासंदर्भात पोलिस अधीक्षक घार्गे  यांच्याशी बोलणं झालं असून एका आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत तर दुसऱ्या आरोपीलाही तातडीने अटक करण्याबाबत पोलिस प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं. पण अटक झाली नाही तर ते प्रशासनाला परवडणार नाही. राज्यात महिला अत्याचाराच्या घटना का वाढत आहेत? गुन्हेगारांना कायद्याचा धाक नाही का? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला असून सरकारने याकडं कठोरपणे लक्ष देण्याची गरज आहे. जेणेकरुन महाराष्ट्रात एकाही भगिनीकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कुणाचीही हिंमत होता कामा नये!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here