इंग्रजांशी लढा देणाऱ्यांचा इतिहास लुप्त राहिला याची खंत- नामदेव भोसले

0

पुणे प्रतिनिधी : (स्नेहा उत्तम मडावी) 

आज आदिवासी  “इतिहास आणि वेदना,हे पुस्तक बाजारात आले भास्कर भोसले यांच्या लेखिनीने  आणी आवघ्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत देशातील आदिवासी पारधी समाजाच्या घरात घरात् आनंदाचे वातावरण निर्माण झाले . लेखक भास्कर भोसले यांनी चार ते पाच लाख रुपये कर्ज काढून क्रातीवीर समशेरसिंग भोसले यांचा इतिहास लोकांन समोर आणला हे आपण विसरुन चालणार नाही असे समाजसेवक. नामदेव भोसले यांनी नायगाव येथील कार्यक्रमात आपला मत व्यक्त केले, आजा १एप्रिल २०२५ हा दिवस आपल्या इतिहासातील एका थोर क्रांतिकारकाच्या स्मृतीचा दिवस आहे – समशेर सिंग भोसले पारधी यांची पुण्यतिथी.

पारधी समुदायाचे हे शूरवीर १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात इंग्रज सत्तेच्या विरोधात लढले आणि आपल्या प्राणांची आहुती देऊन स्वराज्याची ज्योत तेवत ठेवली. त्यांचे जीवन आणि त्यांचा त्याग हा प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे.समशेर सिंग भोसले पारधी हे फक्त एक योद्धा नव्हते, तर पारधी समुदायाचे खरे नेतृत्व होते. त्यांनी आपल्या समाजाला एकत्र करून अन्यायाविरुद्ध लढण्याची हिंमत दिली. जंगलात राहणाऱ्या या समुदायाला त्यांनी स्वातंत्र्याची स्वप्ने दाखवली आणि ती पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. इंग्रज सत्तेच्या क्रूर दडपशाहीविरुद्ध त्यांनी शस्त्र उचलले आणि आपल्या शौर्याने इतिहासाच्या पानांवर अमर झाले. आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण सर्वांनी त्यांच्या बलिदानाला स्मरण करायला हवे. त्यांचा हा लढा केवळ स्वातंत्र्यासाठीच नव्हता, तर समानता आणि न्यायासाठी होता. त्यांचे विचार आणि कर्तृत्व आजही आपल्याला अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची शक्ती देतात.

समशेरसिंग भोसले पारधी समुदाय स्वातंत्र्यलढा क्रांतिकारक पुण्यतिथी आज १ एप्रिल २०२५ हा दिवस आपल्या इतिहासातील एका थोर क्रांतिकारकाच्या स्मृतीचा दिवस आहे – समशेर सिंग भोसले पारधी यांची पुण्यतिथी. पारधी समुदायाचे हे शूरवीर १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात इंग्रज सत्तेच्या विरोधात लढले आणि आपल्या प्राणांची आहुती देऊन स्वराज्याची ज्योत तेवत ठेवली. त्यांचे जीवन आणि त्यांचा त्याग हा प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे.समशेर सिंग भोसले  हे फक्त एक योद्धा नव्हते, तर पारधी समुदायाचे खरे नेतृत्व होते. त्यांनी आपल्या समाजाला एकत्र करून इंग्रजाविरुध व अन्यायाविरुद्ध लढण्याची हिंमत दिली. जंगलात राहणाऱ्या या समुदायाला त्यांनी स्वातंत्र्याची स्वप्ने दाखवली आणि ती पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही.

ब्रिटीश सत्तेच्या क्रूर दडपशाहीविरुद्ध त्यांनी शस्त्र उचलले आणि आपल्या शौर्याने इतिहासाच्या पानांवर अमर झाले.आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण सर्वांनी त्यांच्या बलिदानाला स्मरण करायला हवे. त्यांचा हा लढा केवळ स्वातंत्र्यासाठीच नव्हता, तर समानता आणि न्यायासाठी होता. त्यांचे विचार आणि कर्तृत्व आजही आपल्याला अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची शक्ती देतात. चला, या क्रांतिवीराला आपल्या मनापासून अभिवादन करूया आणि त्यांच्या आदर्शांना आपल्या जीवनात उतरवण्याचा संकल्प करूया. या वेळी  आदिवासी समाजसेवक.नामदेव भोसले,जेष्ट लेखक. भास्कर भोसले,दिलीप भोसले,संजय भोसले,बलवार पवार,बिबीषन चव्हाण, सुनिल चव्हाण,तुकाराम भोसले,अनिल पवार,सचिन भोसले,सुरेखा भोसले,सुनंदा भोसले,उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here