[ad_1]
आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये शुक्रवारी झालेल्या आयपीएल 2025 च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्स (एमआय) ने गुजरात टायटन्स (जीटी) ला 20 धावांनी पराभूत केले. या पराभवासोबत गुजरात टायटन्सचा आयपीएल प्रवास संपुष्टात आला. या पराभवाचं मोठं भावनिक पडसाद मैदानाबाहेरही उमटायला सुरुवात झाली. यावेळी टीमचे हेड कोच आशिष नेहराचा मुलगा सामन्यानंतर स्टेडियममध्येच ढसाढसा रडताना दिसला. नेहराच्या मुलीच्याही डोळ्यांतून पाणी आले, पण तिनं ते लपवण्याचा प्रयत्न केला. या क्षणांना कॅमेऱ्यानं कैद केलं आणि सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहून चाहतेही भावुक झाले.
पराभव पचवणं कठीण
मुंबई इंडियन्सकडून 20 धावांनी पराभव झाल्यानंतर गुजरात टायटन्स IPL 2025 मधून बाहेर पडली. हे वास्तव लहानग्या नेहरा सिबलिंग्ससाठी पचवणं कठीण गेलं. मोठ्या मुलाचा चेहरा उतरलेला होता, आणि तो त्याच्या भाऊ-बहिणींना धीर देण्याचा प्रयत्न करत होता. त्याच वेळी, नेहराचा मुलगा पराभव बघून खूप भावनिक झाला आणि स्टँड्समध्येच जोरजोरात रडू लागला.
Ashish Nehra’s son cries after GT lost the eliminator. #MIvsGT #MIvGT #GTvMI #GTvsMI #RohitSharma #JaspritBumrah pic.twitter.com/gjUtC0S7hp
— kuldeep singh (@kuldeep0745) May 31, 2025
गिलच्या बहिणीने दिला धीर
या भावनिक क्षणी, शुभमन गिलची बहिण शहनील गिल पुढे आली. तिने नेहराच्या मुलीचे सांत्वन केले. नेहराच्या कुटुंबासाठी हा क्षण खूपच कठीण होता, कारण त्यांनी संपूर्ण सिजनमध्ये टीमसोबत प्रवास केला होता.
THIS GAME IS SO CRUEL SOMETIMES.
LOOK AT THIS KID, HE IS CRYING.
I am not sure, but I guess he is the younger son of GT coach Ashish Nehra.#GTvMI #MIvGT #MIvsGT #GTvsMI pic.twitter.com/R6OtdYtIDM
— CricTalk by AJ (@CricTalkbyAJ) May 30, 2025
गुजरातचे पराभव आणि गिलचा अपयश
229 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या गुजरात टायटन्सकडून उत्तम खेळाची अपेक्षा होती. पण शुभमन गिल पहिल्याच ओव्हरमध्ये केवळ 1 धाव करून माघारी परतला. टीमला जोस बटलरची अनुपस्थिती जाणवली. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा आपली धारदार कामगिरी दाखवत 4 ओव्हर्समध्ये केवळ 27 धावा देत 1 विकेट घेतली आणि सामन्यावर पकड मजबूत ठेवली.
गुजरात IPL मधून बाहेर, मुंबईने केली कूच
मुंबई इंडियन्सने हा सामना जिंकून क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश केला आहे, तर गुजरात टायटन्सचा IPL 2025 प्रवास याच टप्प्यावर थांबला. पण या सामन्यानं भावनांची जी लाट निर्माण केली, ती चाहत्यांच्या मनात कायमची कोरली गेली आहे.
[ad_2]